<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433</id><updated>2012-02-16T11:48:06.126-08:00</updated><title type='text'>प्रशांत दीक्षित</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>6</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-8850572192726897398</id><published>2010-02-09T01:57:00.000-08:00</published><updated>2010-02-09T01:59:44.667-08:00</updated><title type='text'>युवराजांचा मुंबई दौरा  कॉंग्रेसची हुजरेगिरी, शिवसेनेचा पराभव आणि महाराष्ट्राची उपेक्षा</title><content type='html'>राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याने मुंबईतील राजकारणाचे रंग बदलून टाकले. शिवसेनेचा उतरता आलेख या दौऱ्याने आणखी रसातळाला नेला. युवराजांसमोर चाललेली कॉंग्रेसची हुजरेगिरी पाहून मराठी माणसाला चीड आली. राहुल गांधींनी या दौऱ्यात मराठी माणसाला काडीचीही किंमत दिली नाही. मात्र, त्याबद्दल मराठी प्रसारमाध्यमांतूनही काहीही टीका झाली नाही. उलट हिंदीपेक्षा मराठी माध्यमंच राहुल गांधींच्या प्रेमात अधिक पडलेली पाहून मराठी माणूस विषण्ण झाला. मुंबईत मराठी माणसाचा दरारा कमी करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले. तेही साधा रेल्वे प्रवास करून. कॉंग्रेसला राजकारण साधतं ते असं.&lt;br /&gt;हा दौरा ज्या पद्धतीने झाला त्याबद्दल राहुल गांधींवर टीका करता येणार नाही. त्यांचा उद्देश स्पष्ट होता. शिवसेनेचं आव्हान स्वीकारून त्यांना मुंबईत फिरून दाखवायचं होतं. त्यासाठी हाती असलेली सरकारची सर्व यंत्रणा पूर्ण ताकदीने वापरायची होती. मुंबई फक्त मराठी माणसाची, हा दावा चुकीचा ठरवायचा होता. मुंबईतील कॉंग्रेसच्या अमराठी मतदारांना दिलासा द्यायचा होता. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्या बरोबरीने मुंबईतील तरुणांमध्ये स्वतःचा ब्रॅन्ड रुजवायचा होता.&lt;br /&gt;हे सर्व करण्यात राहुल गांधी कमालीचे यशस्वी ठरले. राहुल गांधी यांनी स्वतःची एक शैली विकसित केली आहे. ही शैली मायावी आहे. त्यातून मूळ प्रश्न कधीच सुटत नाहीत. पण तरीही ती शैली लोकांना आपलंसं करते. उदाहणार्थ, ते आपल्या मर्यादा, चुका चटकन मान्य करतात. भाईदास सभागृहात तरुणांशी बोलताना त्यांना स्वतःच मान्य केलं की घराणेशाहीमुळे मी राजकारणात आलो आहे, कुठल्याही कौशल्यामुळे नव्हे. या वाक्यावर टाळ्या पडल्या. पुढे गांधी म्हणाले की घराणेशाही मोडून काढण्याकरता मी राजकारणात काम करत आहे. ही व्यवस्था मला बदलायची आहे. या वाक्यालाही टाळ्या पडल्या. तरुणच नव्हे तर माध्यमातील तज्ज्ञही राहुल गांधींच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करू लागले.&lt;br /&gt;आता इथे तार्कीक गडबड आहे. राहुल गांधींसह समस्त गांधी परिवाराने राजकारणातून बाहेर पडणं हाच घराणेशाही संपवण्याचा एक उपाय आहे. तो अंमलात आणण्यास राहुल गांधी तयार नाहीत. तथापि त्यांच्या युक्तिवादातील ही विसंगती कोणी लक्षात आणून देत नाही. म्हणून त्यांच्या शैलीला मायावी म्हटलं. विसंगतीची अशी अनेक उदाहरणं त्यांच्या भाषणातून दाखवता येतील.&lt;br /&gt;तथापि, जनता इतका बारकाईने विचार करत नाही हे राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्कं माहीत आहे. गांधींचा दौरा यशस्वी करायचा हा एकदा निर्णय झाल्यावर कॉंग्रेसचे सर्व नेते कामाला लागले. प्रश्न त्यांच्या नोकरीचा होता. मुंबईत मराठी माणसाचं काय होतं यापेक्षा आपल्या भागातील व्यवहार चालवण्यासाठी मंत्रालयातील खुर्ची सलामत राखणं हीे कॉंग्रेस नेत्यांची अधिक अत्यावश्यक गरज होती. दिल्लीसमोर मान तुकवून मंत्रालयातील दालनं मिळत असतील तर ते करण्यास कोणाचीही तयारी आहे. समजा अशोक चव्हाण यांनी तसं करण्यास नकार दिला असता तर दुसरा कोणी लगेच पुढे आला असता आणि त्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली असती. अशोक चव्हाण यांचं नाव फार तर सी. डी. देशमुखांसारखं सभा-संमेलनातून घेतलं गेलं असतं. मात्र, चव्हाण राजकीय विजनवासात गेले असते.&lt;br /&gt;हे वास्तव पक्कं मनात ठसल्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री राहुल गांधींची वाट पाहात रमाबाई नगरात चक्क तीन तास तिष्ठत होता. खरं तर मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक आहे. जनतेची कामं करून देण्यासाठी त्याला अधिकार मिळाले आहेत. या तीन तासांत जनतेची कितीतरी कामं मार्गी लागली असती. पक्षाच्या सरचिटणीसासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने इतका वेळ फुकट घालवणं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. परंतु, असा आदर्शवादी विचार आता कालबाह्य झाला आहे. फाईलींवर सही करण्याचे अधिकार कायम ठेवण्यासाठी युवराजांची वाट पाहात तिष्ठत राहावंच लागतं. कॉंग्रेस नेत्यांच्या नसानसात ही वृत्ती भिनली आहे.&lt;br /&gt;किंबहुना गांधी घराण्यासमोर नतमस्तक होणं हे अगदी अंगवळणी पडून गेलं आहे. म्हणून राहुल गांधींच्या चपला उचलण्यास राज्यमंत्री बागवे यांना अजिबात संकोच वाटला नाही. आश्चर्य याचं वाटतं की, या घटनेला माध्यमांनीही म्हणावं तसं महत्त्व दिलं नाही.&lt;br /&gt;राहुल गांधींनी दरभंगा इथे केलेल्या वक्तव्यामुळे मराठी माणूस दुखावला आहे. मराठी माणसाला संरक्षणासाठी उत्तर भारतीयांची गरज लागते, असं राहुल गांधी यांनी सुचवलं होतं. याबाबत त्यांच्याकडून खुलासा करून घेण्याची जबाबदारी माध्यमांची होती. माध्यमांनी ती अजिबात पार पाडली नाही. मराठी मनाला डिवचणाऱ्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर जाब विचारण्याऐवजी शिवसेनेचा फ्लॉप शो मराठी माध्यमांसाठी अधिक महत्त्वाचा ठरला. राहुल गांधींनी मराठी माणसाशी संवाद का साधला नाही हा प्रश्न माध्यमांतील कोणालाही पडला नाही. शिवसेनेच्या आंदोलनाचा फज्जा उडाला यात शंका नाही. त्याबद्दल शिवसेनेची खिल्ली उडवण्यातही काही गैर नाही. पण मराठी माणसाच्या भावनिक अस्तित्वाशी भिडणारा मूळ प्रश्न माध्यमांकडून असा डावलला जाणं हे अस्वस्थ करणारं होतं.&lt;br /&gt;मराठी माणसांशी तुम्ही बोलायला हवं, असं राहुल गांधींना साधं सुचवण्याचं धैर्य कॉंग्रेस नेत्यांना नव्हतं. युवक कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राजीव सातव यांनी मात्र भाईदास सभागृहात मराठीतून भाषण केलं. त्यावेळी हिंदी-हिंदी असा गजर झाला. त्यांनी तरीही मराठीतून भाषण केलं आणि याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु, राहुल गांधी कुणासाठी मुंबईत आले होते हे भाईदासमधील या गजराने कळून येतं.&lt;br /&gt;शिवसेनेची स्थिती मात्र "तेलही गेलं आणि तूपही गेलं' अशी झाली. राहुल गांधींच्या या यशस्वी दौऱ्यामुळे आणि त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आल्यास नवल नाही. शिवसेनेच्या दराऱ्यामुळे राहुल गांधी हा दौरा घाईघाईत उरकतील, असा सेना नेत्यांचा अंदाज असावा. राहुल गांधी पूर्ण तयारीनिशी येत आहेत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. विमानतळावर वा भाईदास सभागृहासमोर शिवसेनेने तिखट आंदोलन केलं असतं तर रेल्वे प्रवास करण्याचं धैर्य राहुल गांधींना झालं नसतं. गांधींचा मुंबई दौरा आखणाऱ्यांच्या कल्पकतेचं कौतुक केलं पाहिजे. मुंबईची नस ही मुंबईची लोकल आहे.राहुल गांधींनी ती नस बरोबर पकडली आणि सेनेच्या दराऱ्यातील हवा काढून घेतली. रेल्वेतून प्रवास करण्याचा निर्णय धाडसी होता. पण राहुल मागे हटले नाहीत. थेट जनतेत मिसळण्याची ही पद्धत त्यांनी आजीकडून उचलली असावी. इंदिरा गांधी अशाच सहजतेने जनतेमध्ये मिसळत. एका प्रवाशाची खाली पडलेली वस्तू राहुल गांधींनी तत्परतेने उचलून दिली. ही लकब वडिलांकडून आली असावी. राजीव गांधी दुसऱ्याला मदत करण्यास चटकन पुढे होत. "इथे नगरसेवकही गुर्मीत वावरतात. पण राहुल गांधी माझ्याशी अास्थेने बोलले. खूप बरं वाटलं,' असे उद्‌गार एटीएमजवळ असलेल्या बॅंकेच्या शिपायाने काढले. या गोष्टी छोट्या असतात, पण यातूनच जनतेशी संवाद होत जातो.&lt;br /&gt;उद्धव ठाकरे यांना आंदोलनाची आखणी व्यवस्थित करता आली नाही. मुळात सेनेचे प्रमुख नेतेच घरात राहिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह नव्हता. अन्य प्रमुख नेत्यांबरोबर स्वतः उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले असते तर राहुल गांधींना करिष्मा दाखवता आला नसता. गडावरून आदेश देऊन आंदोलनं उभी राहात नाहीत. दरबारी राजकारणात उद्धव ठाकरे निष्णात आहेत. तशा राजकारणाचीही संघटनेला जरुरी असते. पण त्याला जनतेच्या राजकारणाचीही जोड द्यावी लागते. सत्ता टिकवताना राहुल गांधी दरबारी राजकारण खेळतात. पण त्याला जनतेच्या राजकारणाची जोड देतात. एका मुंबई भेटीत त्यांनी कॉंग्रेसचा शेअर वर नेला. तोही कोणताही दंगाधोपा न करता. नेत्याकडून अशाच कृतीची अपेक्षा असते.&lt;br /&gt;शिवसेनेला नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्यात अपयश येत आहे. संघटनेतील अनेक नेते प्रस्थापित झाले आहेत. राहुल गांधी लोकलने प्रवास करत आहेत ही बातमी फुटल्यानंतरही शिवसेनेला काही झटपट कृती करून दाखवता आली असती. पूर्वी सेना कार्यकर्ते तसं करत असत. यावेळी मात्र तसं झालं नाही. राहुल गांधींशी सामना कसा करावा हेच उद्धव ठाकरेंना कळलं नाही. बाळासाहेबांचा आदेश असूनही हे घडलं. असं व्हायला नको होतं असंच मराठी माणसाला वाटत होतं.&lt;br /&gt;याउलट राज ठाकरे आपला डाव व्यवस्थित खेळले. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आता शिवसेनेने रणशिंग फुंकलं होतं. मात्र, या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय त्यांनी शहाणपणाने घेतला. उलट मराठीच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन केलं. शिवसेनेचं आंदोलन फसलं आणि मनसेचा भाव आपोआप वाढला.&lt;br /&gt;या सर्व घडामोडीत उपेक्षित राहिला तो मराठी माणूस. राहुल गांधींना मिळालेल्या यशामुळे आणि प्रसिद्धीमुळे मुंबईतील त्याची ताकद आटली. त्याचा दरारा कमी झाला. त्याची वेदना तशीच ठसठसत राहिली. शुक्रवारी रात्री एका मित्राचा फोन आला. एका मराठी खासगी वाहिनीवर चाललेली चर्चा पाहून तो अस्वस्थ झाला होता. या चर्चेचं वर्णन करताना तो म्हणाला, "दोन मराठी नेत्यांशी दोन मराठी पत्रकार वाद घालत आहेत आणि कृपाशंकर सिंह हा वाद मोठ्या मजेत पाहात आहेत.'&lt;br /&gt;मुंबईतील परिस्थितीचं हे अचूक वर्णन आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-8850572192726897398?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/8850572192726897398/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=8850572192726897398' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/8850572192726897398'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/8850572192726897398'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2010/02/blog-post_3212.html' title='युवराजांचा मुंबई दौरा  कॉंग्रेसची हुजरेगिरी, शिवसेनेचा पराभव आणि महाराष्ट्राची उपेक्षा'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-4700925571602726568</id><published>2010-02-09T01:54:00.000-08:00</published><updated>2010-02-09T01:55:00.909-08:00</updated><title type='text'>राहुलच्या नाटकाला मराठी माणूस भुलेल काय?</title><content type='html'>राहुल गांधी यांनी नाटक मस्त जमविले. अंधेरीतील भाईदासवरून घाटकोपरला जाण्यासाठी त्यांना हॅलिपॅडकडे नेण्यात येत असताना त्यांनी म्हणे "अचानक' मार्ग बदलला. ते स्टेशनकडे वळले. खिशात पैसे नसल्याने एटीएममधून पैसे काढले. तिकीट घेऊन लोकलमध्ये बसले. दादरला उतरून भला मोठा ब्रीज पार करून त्यांनी कल्याण फास्ट पकडली आणि एखाद्या सराईत मुंबईकराप्रमाणे घाटकोपरला आले. कॉंग्रेसचा युवराज आम आदमीप्रमाणे मुंबईकर झाला. शिवसेनेचा धमकीवजा इशारा धुडकावून त्याने रेल्वेप्रवास केला.&lt;br /&gt;तमाम चॅनेलवाले व अमराठी मुंबईकर जाम खुष झाले. कॉंग्रेसवाल्यांचा आनंद तर ऊतू जाऊ लागला. राहुलने शिवसेनेची गोची केली म्हणून शिवसेनाविरोधी ब्रिगेडही टाळ्या वाजवू लागली. मुंबईवर कोण राज्य करतं ते राहुलने दाखवून दिले असेही म्हटले गेले. राहुल गांधी शहरात दिमाखात फिरले आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तुरुंगात अस्वस्थपणे फिरत राहिले.&lt;br /&gt;प्रश्न असा आहे की, राहुलच्या या नाटकावर माध्यमे व अमराठी मुंबईकर फिदा झाले असले तरी मराठी माणूस अशा देखाव्याला फसेल का? हा प्रश्न महत्वाचा आहे. इथे मराठी माणूस म्हणजे शिवसेनाप्रेमी वा मनसेचा कार्यकर्ता नव्हे. हा मराठी माणूस म्हणजे माध्यमांमध्ये चर्चा करणारा अभिजन वर्गही नव्हे. अमराठी लोकांबरोबर मजा मारणारा नवश्रीमंत मराठी वर्गही नव्हे.&lt;br /&gt;हा मराठी माणूस म्हणजे इमानाने नोकरी करणारा, मराठी भाषेबाबत आस्था असणारा आणि महाराष्ट्राच्या परंपरेबाबत प्रेम असणारा नोकरदार मराठी माणूस.&lt;br /&gt;राहुल गांधींचा लोकल प्रवास या मराठी माणसाला कितपत भावला असेल याचा शोध घेतला पाहिजे. कारण त्याला लागलेली ठेच वेगळी आहे. मराठी भाषेला, महाराष्ट्राला हिणवण्याच्या उत्तर भारताच्या वृत्तीने तो दुखावला गेला आहे. त्यात भर पडली आहे कॉंग्रेस नेत्यांच्या दिल्लीपुढे दबण्याच्या वृत्तीची. मुंबईत तुम्ही दुय्यम दर्जाचे आहात हे गेले काही दिवस हिंदी-इंग्रजी माध्यमांतून सातत्याने सुचविले जात आहे.&lt;br /&gt;मराठी माणसाच्या मनात याचा राग खदखदत आहे. असा राग येण्यासाठी तो शिवसेना वा मनसेचा समर्थक असण्याची गरज नाही. शिवसेना पूर्वीइतकी मराठी प्रेमी राहिली आहे का याचीही शंका त्याच्या मनात आहे. मराठीला डावलल्याचा रागाबरोबरच त्याला अधिक खंत वाटते ती आपलेच राज्य सरकार आपल्याबरोबर नसल्याची.&lt;br /&gt;राहुल गांधींनी तर त्याला खूपच डिवचले आहे. बिहारमधील दरभंगा येथील राहुल गांधींचे भाषण नीट ऐकले व पाहिले तर एखाद्या मवाळ मराठी माणसालाही राग येईल. मुंबईवरील हल्ल्याचा उल्लेख राहूल गांधींनी केला हे सर्वांना माहित आहे. पण त्या भाषणातील पुढील वाक्य अस्सल मराठी माणसाला झोंबणारे आहे. गांधी म्हणाले,"... म्हणजे संकटात सापडलात की तुम्हाला बिहारयुपीवाल्यांची मदत लागते आणि नंतर त्यांना विरोध करता...'&lt;br /&gt;महाराष्ट्रीय पराक्रमी परंपरेचा अपमान करणारे हे उद्‌गार आहेत आणि म्हणून त्याचा निषेध झाला पाहिजे. परकीय राज्यांसमोर जेव्हा अनेक प्रांत हुजरेगिरी करीत होते, तेव्हा फक्त महाराष्ट्रीय मराठी योद्धेच पार अटकेपार जात होते. परकीयांसमोर झुकण्याची नव्हे तर संघर्ष करण्याची परंपरा महाराष्ट्राला आहे. दुर्दैवाने राहुलला हा इतिहास माहित नाही. त्याचे कौतुक करीत सुटणाऱ्या माध्यमांनाही इतिहासाचे तितके भान नाही.&lt;br /&gt;मुंबईत मराठीचा सन्मान केला जावा इतकीच माफक मागणी मराठी माणसाची आहे. पण त्याला प्रत्युत्तर देताना तुम्ही मुळात "दुबळे' आहात असे राहुल गांधींनी दरभंगामध्ये सुचविले आहे. राहुल गांधी यांनी लोकलमधून प्रवास केला किंवा ते झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये मिसळले म्हणून मराठी मनाला त्यांनी केलेली ही जखम भरून निघेल काय हा खरा प्रश्न आहे.&lt;br /&gt;राहुल गांधी यांचा हा लोकल प्रवास अचानक केलेला असूच शकत नाही. व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेची ज्यांना माहिती आहे त्यांचा अशा भाकड कथांवर विश्वास बसणार नाही. दौऱ्यातील हा बदल गुप्त ठेवण्यात सुरक्षा व्यवस्था यशस्वी झाली हे खरे. काही निवडक कॅमेरामनना या दौऱ्यात सहभागीही होता आले. कारण रेल्वे प्रवासाची चित्रे दिसणे आवश्यक होते. खरोखरच "अचानक' दौरा केला असता तर हे शक्य झाले नसते.&lt;br /&gt;लोकलमधून प्रवास करून राहूल गांधींनी दोन संदेश दिले. पहिला संदेश अमराठी शहरवासियांना होता. शिवसेनेच्या धमकीला न जुमानता मुंबईच्या लोकलमधून मी कसा फिरलो ते पहा, हे त्यांना सांगायचे होते. अमराठी मुंबईकर त्यामुळे खुष झाले. लोकलमधील अमराठी प्रवाशात याच गोष्टीची चर्चा सुरू होती. राहुल गांधींच्या लोकल दौऱ्यामुळे कॉंग्रेसची मते किमान 50 हजारांनी वाढली, असे एक गुजराती व्यवसायिक मोठ्या खुषीत येऊन सांगत होते, तर शिवसेनेची गोची झाली असे दुसरे एकजण थोड्या हळू आवाजात म्हणत होते.&lt;br /&gt;म्हणजे राहूल गांधींचा हा दौरा मराठी माणसासाठी नव्हता. त्याची वेदना समजून घेण्यासाठी नव्हता. तर कॉंग्रेसच्या अमराठी मतदारांना खुष करण्यासाठी होता.&lt;br /&gt;राहुल गांधींचा दुसरा संदेश मात्र मराठी माणसाला होता. राज्यकर्ते मराठी असले तरी खरे राज्य आमचे आहे हे समजून घ्या असे त्यांना सांगायचे होते.&lt;br /&gt;आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी या संदेशाला जोडे उचलून कृतीरुप दिले.&lt;br /&gt;याचा अर्थ ते मराठीद्वेष्टे आहेत असा नाही. महाराष्ट्राबद्दल त्यांना आकस आहे असेही नाही. फक्त महाराष्ट्राने आपली पायरी सोडू नये इतकेच त्यांना सुचवायचे आहे.&lt;br /&gt;राहुल गांधींना मराठी माणसाची कदर असती तर दरभंगा येथील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांनी काही खुलासा केला असता. निदान मराठी माणसाची चीड समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनसे किंवा शिवसेनाला इतका प्रतिसाद का मिळतो हे समजून घेतले असते. लोकलमधून प्रवास करण्यापेक्षा राहूल गांधी यांनी मराठी माणसाशी संवाद साधला असता तर मराठी माणसाला निदान शाब्दिक तरी समाधान मिळाले असते. तसे काहीच झाले नाही. मुंबईत येऊनही राहुल गांधींकडून मराठी माणूस दुर्लक्षितच राहिला. तेही मराठीवरून इतके वातावरण तापलेले असताना.&lt;br /&gt;म्हणून हा प्रश्न पडतो की प्रसारमाध्यमांप्रमाणेच मराठी माणूसही राहूल गांधींच्या या लोकल नाटकाला फसेल का? आम आदमीमध्ये मिसळण्याची, त्यांच्याबरोबर झोपडीत भाजी-भाकरी खाण्याची. गरीबांबाबत सतत बोलण्याची ही कला गांधी घराण्याला चांगली अवगत आहे. तिचा विलक्षण परिणाम उत्तर भारतात नेहमी दिसतो. तसाच परिणाम स्वाभिमानी वृत्तीच्या मराठी माणसावर होईल का?&lt;br /&gt;प्रश्न बराच छळणारा आहे. त्याचे उत्तर लवकर सापडणे कठीण आहे.&lt;br /&gt;आणखी एक प्रश्न उगाचच सतावतो. समजा असाच लोकल प्रवास राज ठाकरे, नरेंद्र मोदी वा बाळासाहेब ठाकरे यांनी केला असता तर माध्यमांनी त्याचे कसे विश्लेषण केले असते. त्यालाही "आम आदमी'शी संवाद म्हटले असते का?&lt;br /&gt;या प्रश्नाचाही विचार करायचा हरकत नाही.&lt;br /&gt;---------&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-4700925571602726568?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/4700925571602726568/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=4700925571602726568' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/4700925571602726568'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/4700925571602726568'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2010/02/blog-post_09.html' title='राहुलच्या नाटकाला मराठी माणूस भुलेल काय?'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-378980059663286198</id><published>2010-02-06T03:40:00.000-08:00</published><updated>2010-02-06T03:48:26.260-08:00</updated><title type='text'>राज ठाकरेंचा समंजस सूर</title><content type='html'>राज ठाकरेंचा समंजस सूर&lt;br /&gt;राज ठाकरेंच्या डोंबिवलीच्या सभेबद्दल नेहमीप्रमाणे सर्वत्र उत्सुकता होती. सध्या सर्वाधिक टीआरपी मिळविणारे ते एकमेव नेते आहेत. साहजिकच डोंबिवलीत तोबा गर्दी होती व शहरात अन्यत्र कित्येकजण टीव्हीसमोर बसले होते.&lt;br /&gt;याआधी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी बातमी पुरविली नसल्याने प्रसारमाध्यमे निराश झाली होती. तुमच्यासाठी आज माझ्याकडे खुराक नाही असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. तरीही काही चमचमीत मिळेल अशी अपेक्षा होती. हिंदी व इंग्रजी चित्रवाहिन्या तर बराच फौजफाटा घेऊन बसल्या होत्या. मराठीवरून राज ठाकरे काही बोलले की त्याला प्रक्षोभक स्वरुप देण्याची शास्त्रशुद्ध तयारी अमराठी मीडीआमध्ये होती. परंतु, राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काही नवे बोलण्याऐवजी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. तो मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा असल्याने कार्यकर्त्यानी काम कसे करावे हे सांगण्यावर राज ठाकरे यांनी भर दिला हे समजू शकते.&lt;br /&gt;पण पदाधिकाऱ्यांसमोर ते मराठीच्या मुद्यावर काही नवे बोलतील असे वाटत होते. अलिकडे शिवसेनेने मराठी व पाकिस्तानी क्रिकेटपटूंवरून रान उठविले आहे. शिवसेनेच्या आंदोलनाला चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो. इंटरनेटवर जाल तर गेले काही दिवस सर्वाधिक हीट बातम्यांमध्ये शिवसेनेचा उल्लेख असतो. स्वतः बाळासाहेब ठाकरे सक्रीय झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही जोर चढला आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद त्यांच्यातील वाढता आत्मविश्वास दाखविणारी होती. विधानसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून शिवसेना आक्रमक होत चालल्याचे दिसत होते. अर्थात महापालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे हे लपून राहत नाही.&lt;br /&gt;या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर त्यांच्याकडे लक्ष लावून बसलेल्या मराठी माणसांना अस्वस्थ करीत होते. इतका गदारोळ उठत असताना राजसाहेबांनी काहीतरी बोलले पाहिजे अशी अपेक्षा होती.&lt;br /&gt;ही अपेक्षा डोंबिवलीत पूर्ण होईल असे वाटत होते. पण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी थोडा वेगळा सूर लावला आणि त्यांच्या या नव्या सूराचे सर्व थरातून स्वागत होईल. राज ठाकरे यांचे भाषण नेहमीप्रमाणे आक्रमक होते. भाषा दणकट होती. आवाजाला धार होती. मराठी माणसाच्या मनात खदखदणाऱ्या असंतोषाला त्यांच्या भाषणातून वाट मिळत होती. मराठीचा मुद्दा त्यांनी अजिबात सोडला नव्हता वा त्यामध्ये नरमाईही नव्हती.&lt;br /&gt;तरीही त्यांचे भाषण नेहमीपेक्षा वेगळे होते. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणातील आक्रमकता कधीकधी विखारी होत असे. यावेळी तसे नव्हते. यावेळच्या भाषणातील आक्रमकता ही आत्मविश्वासातून आलेली भासत होती. गेली दोन वर्षे ज्या मुद्यावरून रान उठविले तोच मुद्दा आता सर्वमान्य होत चालला आहे याचे भान आल्यावर आलेला आत्मविश्वास त्यांच्या भाषणात डोकावत होता. शिवसेनेवर त्यांनी नाव न घेता टीका केली. पण त्यामध्ये चिडचिड नव्हती. आता कंठ का फुटलाय तो तुम्ही लक्षात घ्या या एका वाक्यात आपलाच मुद्दा शिवसेनेला उचलावा लागल्याचे त्यांनी दाखवून दिले. मराठीच्या मुद्यावर मतदार एकवटू शकतात हे लक्षात आल्याने शिवसेना आता ही आंदोलने करीत आहे असेही त्यांनी म्हटले. अर्थात फक्त मराठीच्या मुद्यावर मराठी माणसांची एकजूट होऊन सत्ता मिळू शकते हे राजकीय अर्धसत्य आहे. पण तो मुद्दा इथे महत्वाचा नसून राज ठाकरे यांची शिवसेनेवरील टीका ही अतिशय संयमी होती हे वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे.&lt;br /&gt;मराठी माणसानेच मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे कारण मराठी भाषेला मराठी माणसाशिवाय कोणी तारणार नाही यावरच राज ठाकरे यांनी सर्व भर दिला. या विषयाला राजकीय कंगोरे येऊ दिले नाहीत. उलट मराठी भाषेला आव्हान मिळाले तर पक्षभेद विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. हे आवाहन करताना त्यांनी शिवसेनेचेही नाव घेतले. गेले काही दिवस अमराठी वाहिन्यांवरून जो मराठीद्वेषाचा भडिमार होत आहे त्यामुळे सर्वच मराठी माणसे अस्वस्थ आहेत. एक सर्वपक्षीय मराठी मानसिकता समाजात निर्माण होत आहे. कार्यकर्ते वा मतदार कोणत्याही पक्षाचे असोत, मराठीबाबत ते मानसिक स्तरावर तरी एकत्र आलेले दिसतात. टॅक्सीवाल्यांच्या परवान्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शाब्दिक खेळामुळे मराठी माणूस खूप दुखावला गेला आहे. मराठी माणसाची कॉंग्रेसकडून महाराष्ट्रप्रेमाची अपेक्षा नाही. ती अपेक्षा शिवसेनेकडून आहे. शिवसेनेनेही त्या प्रश्नावर आवाज उठविला आहे व आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही मराठीचा मुद्दा उचलून धरीत आहे. मराठी समाजातील हे वातावरण हेरण्याची हुशारी राज ठाकरे यांच्यात असल्याने त्यांनी सर्वांना समाधान देईल असा सर्वसमावेशक पवित्रा घेतला. भाषेवरून आक्रमक होण्याची खेळी सर्वांच्या आधी ते खेळले आहेत. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. आता अन्य पक्ष ती खेळी खेळू लागल्यावर राज ठाकरे यांनी पुढे जात पक्षाच्या पलिकडे जाऊन भाषाप्रेमाच्या जोरावर एकत्र येण्याचे आवाहन केले. आक्रमकपणा न सोडता हे भावनिक आवाहन राज ठाकरे यांना करता आले कारण आक्रमकता सिद्ध करण्याची त्यांना आता गरज नाही. पक्षाचा पाया बऱ्यापैकी पक्का झाल्यामुळे ते आता अधिक व्यापक भूमिका घेऊ शकतात. ही व्यापक भूमिका कायदेशीरदृष्ट्याही अडचणीची ठरणार नाही. उद्या सर्व पक्ष भाषेवरून खरोखऱच एकत्र आले तर त्याचे श्रेय साहजिकच राज ठाकरे यांना मिळेल. मराठी माणसाला हे पसंत पडेल. कारण त्याला मराठीवरून परस्परांत भांडणे नको आहेत.&lt;br /&gt;राज ठाकरे यांचा हा नवा सूर लक्षात घेण्याजोगा आहे. राहुल गांधींच्या विरोधात शिवसेना अधिकाधिक आक्रमक होत असताना त्यांनी त्या स्पर्धेत न उतरता पुढच्या वर्तुळात उडी मारली आहे. राजकीय नेत्याला काही निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतात. नेतृत्वाची ओळख अशा निर्णयातूनच होत असते. मराठी माणसाला आत्ता मराठी भाषेवरून सर्वपक्षीय एकजूट हवी आहे. राज ठाकरे यांना ते बरोबर समजले आहे. याआधी त्यांनी फक्त मराठी भाषा येऊन चालणार नाही, महाराष्ट्रीय असणे आवश्यक आहे असे सांगितले आणि आता या मुद्यावर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. हे दोन्ही मुद्दे मराठी माणसांना पसंत पडणारे आहेत.&lt;br /&gt;---------&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-378980059663286198?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/378980059663286198/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=378980059663286198' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/378980059663286198'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/378980059663286198'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2010/02/blog-post_06.html' title='राज ठाकरेंचा समंजस सूर'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-5107900547684330620</id><published>2010-02-05T07:32:00.000-08:00</published><updated>2010-02-05T07:44:12.227-08:00</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_g7Tp0LvwJnE/S2w8qjpdfWI/AAAAAAAAAAU/7-WWc9uKI8M/s1600-h/raj06.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5434785552150658402" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 226px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_g7Tp0LvwJnE/S2w8qjpdfWI/AAAAAAAAAAU/7-WWc9uKI8M/s320/raj06.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_g7Tp0LvwJnE/S2w6n8xAcvI/AAAAAAAAAAM/o06ltvj1tHM/s1600-h/raj05.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-5107900547684330620?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/5107900547684330620/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=5107900547684330620' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/5107900547684330620'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/5107900547684330620'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2010/02/blog-post.html' title=''/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_g7Tp0LvwJnE/S2w8qjpdfWI/AAAAAAAAAAU/7-WWc9uKI8M/s72-c/raj06.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-6817513389843838999</id><published>2008-07-05T05:29:00.000-07:00</published><updated>2008-07-05T05:48:52.589-07:00</updated><title type='text'>आषाढाचा पाऊस !!!!!!!</title><content type='html'>&lt;p&gt;महाकवी कालीदासाच्या मेघदूत या काव्यातील "आषाढस्य प्रथम दिवसे' हा चरण तारूण्याच्या धुंदीत अलगद घेऊन जातो.&lt;/p&gt;&lt;p&gt;आषाढाच्या पहिल्या दिवशी डोंगरमाथ्याशी खेळणाऱ्या मेघाचे हे वर्णन. या मेघाला आपला दूत बनवून प्रेयसीकडे पाठविणाऱ्या यक्षाची ही कथा. पण कवितेच्या माध्यमातून सादर केलेली कथा एवढेच "मेघदूता'चे स्वरुप राहात नाही. मनापासून, खराखुरा आस्वाद घेत "मेघदूत' वाचत गेले तर आपल्या भाववृत्ती इतक्‍या तरल व सूक्ष्म होतात की आयुष्याकडे पाहण्याची नजरच बदलून जाते. वृत्ती प्रफुल्लीत होतात. जगण्याला रुची येते.&lt;/p&gt;&lt;p&gt;आजच्या पिढीला मेघदूत अधिक भावेल. भारतीय संस्कृतीने एकेकाळी जपलेली शृंगाराची अभिजात कला आजच्या तरूण-तरूणींना अधिक सुसंस्कृत करून जाईल. अभिजात प्रेम म्हणजे काय हेही सहज कळेल. दुर्दैवाने अशा काव्याचा स्वतः उत्कटतेने आस्वाद घेऊन तो रसिकांपर्यंत पोहोचविणारे आता शोधूनही सापडत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;"सकाळ'च्या 4 जुलै 08च्या अंकात डॉ निरुपमा कुलकर्णी यांनी "मेघदूता'ची त्रोटक ओळख करून दिली आहे. "मेघदूता'चा अत्यल्प परिचय करून घेण्यासाठी जरुर वाचावा असा हा लेख आहे. कालीदास आणि त्यावेळची भारतीय संस्कृती किती रसिक होती याची या लेखातील दोन उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. &lt;/p&gt;&lt;p&gt;उज्जैन नगरीवर कालीदासाचे फार प्रेम. अलकानगरीच्या दिशेने करायवाच्या मेघाच्या मूळ प्रवासात उज्जैन नगरी येत नसली तरी वाट वाकडी करून मेघाने तिकडे जावे असा आग्रह यक्ष धरतो. कारण.. &lt;em&gt;"तेथील स्त्रियांचे चंचल नेत्रकटाक्ष प्राशन करण्यासारखे आहेत'... &lt;/em&gt;आणि या सुंदर स्त्रियांच्या नेत्रकटाक्षांचे सौंदर्य अनुभवता येत नसेल तर "लोचनैवंश्‍चिंतोसि', म्हणजे &lt;em&gt;"डोळे असून तुझा जन्म वाया गेला असे समज'&lt;/em&gt; असे यक्ष सांगतो...&lt;/p&gt;&lt;p&gt;पुढे अलकानगरीत गेल्यावर "माझ्या प्रिय पत्नीला स्पर्श करून जागे करू नकोस' असा इशाराही यक्ष देतो. हलकेच गुलाबपाणी शिंपडून तिला जागे कर आणि मग माझा निरोप सांग असे यक्षाने म्हटले आहे. माझ्या पत्नीशी तुझे &lt;strong&gt;"सख्यत्वा'चे&lt;/strong&gt; नाते असू दे, याची आठवण करून देण्यास यक्ष विसरत नाही. यक्षाच्या या सावध मनोवृत्तीची गंमत वाटते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीची मनोवस्था कालिदासाने किती बारकाईने टिपली आहे पहा!!&lt;/p&gt;&lt;p&gt;"मेघदूता'बद्दल लिहावे तितके थोडे. पण आज आषाढाच्या दुसऱ्या दिवशी, त्यातील "लोचनैवंश्‍चिंतोसि' हा शब्द फार छळतो आहे. "डोळे असून जन्म वाया गेला की काय' अशी अनुभूती अलिकडे वारंवार येते. ती का येते कळत नाही. पण एकेकाळी मनाला धुंद करणारा पाऊस आज तशी धुंदी आणीत नाही. खरे तर आता सर्व सुखे सज्ज असतात. हाती पैसा असतो, विविध पर्याय समोर असतात, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते, आयुष्याला थोडीफार संपन्नता आलेली असते.&lt;/p&gt;&lt;p&gt;तरूणपणी यातील काहीच नव्हते. खिसा बहुदा रिकामा असायचा आणि इतरही अनेक कटकटी असायच्या. तरीही तेव्हाचा पाऊस शरीरालाच नव्हे तर मनाला गारवा द्यायचा. तेव्हा असे वाटायचे की आयुष्यात आपण जसे जसे अधिक अनुभवसंपन्न होऊ, तशा आपल्या चित्तवृत्ती अधिक बहरत जातील. निसर्गाचा व आयुष्याचा आस्वाद घेण्याची खुमारी वाढत जाईल. पण तसे होताना दिसत नाही. उलट आयुष्यातील रस कमी होताना जाणवतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;असे का व्हावे... ?&lt;/p&gt;&lt;p&gt;पाडगांवकरांची फार पूर्वी वाचलेली कविता अचानक आठवली. त्यावेळी ती फक्त आवडली होती, आता त्या कवितेचा अनुभव घेता येतो. काव्य म्हणून काही ही कविता उंचीची नाही. मात्र त्यातील निरीक्षण खूप वरच्या दर्जाचे आहे. ही कविता अशी ः&lt;/p&gt;&lt;p&gt;शास्त्रे सगळी कोळून प्यालो,&lt;/p&gt;&lt;p&gt;असे मुखोग्दत पुराण, गीता&lt;/p&gt;&lt;p&gt;ईश्‍वर आहे अथवा नाही&lt;/p&gt;&lt;p&gt;बसून करतो चर्चा आता&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;जाणतसे इतिहास जगाचा&lt;/p&gt;&lt;p&gt;पारायण हो विज्ञानाचे&lt;/p&gt;&lt;p&gt;खगोल-भूगोलादिक विद्या&lt;/p&gt;&lt;p&gt;माझ्या जिव्हेवरती नाचे&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;तत्वज्ञाने समाजरचना&lt;/p&gt;&lt;p&gt;यातही मी झालो पारंगत&lt;/p&gt;&lt;p&gt;अर्थशास्त्र, परमार्थशास्त्रही&lt;/p&gt;&lt;p&gt;यांची तर नेहमीची पंगत&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;आषाढाच्या पहिल्या दिवशी&lt;/p&gt;&lt;p&gt;जेव्हा जमले मेघ अचानक&lt;/p&gt;&lt;p&gt;पागल वारा, पागल धारा&lt;/p&gt;&lt;p&gt;खड्‌गापरी बिजलीची लखलख&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;थेंब बिलोरी वेचू लागली&lt;/p&gt;&lt;p&gt;ओणवून गवताची पाती&lt;/p&gt;&lt;p&gt;मागे सारीत केस आपुले&lt;/p&gt;&lt;p&gt;खट्याळ छाया भिजती न्हाती&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;जमून पोरे रस्त्यावरती&lt;/p&gt;&lt;p&gt;अंगावरती झेलीत धारा&lt;/p&gt;&lt;p&gt;गाऊ लागली धुंद अनावर&lt;/p&gt;&lt;p&gt;आला पाऊस, आला वारा !!&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;कोणी कोंडली मुठीत आपुल्या&lt;/p&gt;&lt;p&gt;थेंबांची चमचमती दौलत&lt;/p&gt;&lt;p&gt;कुणी घेतली खट्याळ फिरकी&lt;/p&gt;&lt;p&gt;लचकत, थबकत, झिंगत, डोलत&lt;/p&gt;&lt;p&gt;मीही पाहिले आकाशी&lt;/p&gt;&lt;p&gt;पुन्हा एकदा डोळे उघडून&lt;/p&gt;&lt;p&gt;ती मस्ती पण नव्हती हृदयी&lt;/p&gt;&lt;p&gt;नव्हते तसले अद्‌भूत दर्शन&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;सहस्त्र धारांची ती जादू&lt;/p&gt;&lt;p&gt;दिसून मजला दिसली नाही&lt;/p&gt;&lt;p&gt;अणूअणूतील पागल धुंदी&lt;/p&gt;&lt;p&gt;कळली, पण जाणवली नाही&lt;/p&gt;&lt;p&gt;आता बसलो आहे शोधीत&lt;/p&gt;&lt;p&gt;दीर्घ तपस्येतही जे हुकले&lt;/p&gt;&lt;p&gt;हात कपाळा लावून म्हणतो&lt;/p&gt;&lt;p&gt;कसे काय अन्‌ कोठे चुकले ??&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;या प्रश्‍नाचे उत्तर मोठे अवघड आहे. रोजच्या धावपळीतून आपला भौतिक स्तर उंचावत असेल, पण सौंदर्य उपभोगण्याची वृत्ती खालावत जाते का? आयुष्यातील तरलता आपण घालवून बसतो का? सर्व काही ठाकठीक असूनही मनात आनंदाची उर्मी का उठत नाही? "आहे मनोहर तरी गमते उदास' हा अनुभव केवळ सुनीताबाईंना नाही तर आपल्यालाही रोज येत असतो ना?&lt;/p&gt;&lt;p&gt;सौंदर्याचा, आनंदाचा हा मनातील कप्पा बंद कधी होतो. आनंदाचा मनातील कप्पा बंद होण्यामागची कारणे काही वेगळीच असावीत. "सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते..' करण्याच्या धडपडीत मनाचा ताजेपणा आपण कधी घालवून बसतो ते लक्षातच येत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;मन बनचुके बनत जाते. ते विद्वान असते. विद्वत्तेची सर्वोच्च पायरी गाठते किंवा थातूरमातूर माहितीवर सभा मारून नेण्याची कला आत्मसात करते. पण या प्रवासात निसर्गाशी आणि याच निसर्गाचा एक भाग असलेल्या अन्य माणसांशी, सहकाऱ्यांशी, मित्रांशी, पत्नीशी, मुलांशी थेट संपर्क साधण्याची क्षमता मन हरवून बसते.&lt;/p&gt;&lt;p&gt;मग अनुभव गोळा केले जातात, पण ते मनात उतरत नाहीत, मनाला भिडत नाहीत. अणुअणूतील पागल धुंदी कळते, पण "जाणवत' नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;काही गोष्टींचा हव्यास बाळगणे, त्या हस्तगत करणे हे आज आपल्याला अत्यावश्‍यक वाटते. जगण्याचा हा संघर्षमय मार्गच योग्य आहे अशी आपली खात्री झाली आहे. पण सतत कशा ना कशाचा हव्यास धरणारे मन आतून गंजत चालले आहे का, याचा आपण कधी विचारच करीत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;पाडगावकरांची दुसरी कविता इथे आठवते...&lt;/p&gt;&lt;p&gt;डोळ्यावर गंज चढतो,&lt;/p&gt;&lt;p&gt;झाडे "नेहमीची' होतात,&lt;/p&gt;&lt;p&gt;आणि पाखरे "रोजची'च&lt;/p&gt;&lt;p&gt;पंखामुळे उडू लागतात&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;मिठीलाही गंज चढतो&lt;/p&gt;&lt;p&gt;"सवयी'च्या रात्रींचा&lt;/p&gt;&lt;p&gt;विश्‍वासाला आधार पुरतो&lt;/p&gt;&lt;p&gt;फक्त मिटल्या खिडकीचा&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;शब्दांवर गंज चढताच&lt;/p&gt;&lt;p&gt;भाव येतो गाण्यांना&lt;/p&gt;&lt;p&gt;बुडबुड्यांची रंगीत गर्दी&lt;/p&gt;&lt;p&gt;खुषीत फेकते नाण्यांना&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;आचार्यांना गंज चढतो&lt;/p&gt;&lt;p&gt;अध्यात्माच्या भाषेचा&lt;/p&gt;&lt;p&gt;प्रवचनांच्या कफनीमागे&lt;/p&gt;&lt;p&gt;वास कुबट आशेचा&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;आत्म्याला गंज चढताच&lt;/p&gt;&lt;p&gt;सिंहासने जवळ येतात&lt;/p&gt;&lt;p&gt;लाकडाच्या मठ्ठ खुर्च्या&lt;/p&gt;&lt;p&gt;मऊ तेलकट सलाम करतात&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;गंज चढतो यांना आणि&lt;/p&gt;&lt;p&gt;गंज चढतो त्यांनाही,&lt;/p&gt;&lt;p&gt;गंजाचा कारखानदार&lt;/p&gt;&lt;p&gt;आज कधीच तोट्यात नाही....&lt;/p&gt;&lt;p&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;आयुष्याची "सवय' झाली की गंज चढणारच आणि गांजलेले मन निसर्गाचा आस्वाद कसा घेणार? ती क्षमताच ते हरवून बसते. पदवी, पदे, पैसा, प्रसिद्धी अशा अनेक गोष्टी ते सहजी गोळा करील, पण त्याचे "जगणे' थांबलेले असते. मनातील जिप्सी निष्प्राण झालेला असतो. त्याची नजर बंदिस्त झालेली असते. &lt;/p&gt;&lt;p&gt;"लोचनैवंश्‍चिंतोसि'... कालिदासाचा हा शब्द एकदम जाग आणतो. "गड्या डोळे असूनही जन्म व्यर्थ जातो आहे बघ....!! '&lt;/p&gt;&lt;p&gt;मग मी आषाढाच्या पावसाकडे "पुन्हा एकदा डोळे उघडून' पाहू लागतो!!! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-6817513389843838999?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/6817513389843838999/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=6817513389843838999' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/6817513389843838999'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/6817513389843838999'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2008/07/blog-post_05.html' title='आषाढाचा पाऊस !!!!!!!'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3435637611605346433.post-1008411023670304442</id><published>2008-07-04T06:18:00.000-07:00</published><updated>2008-07-04T06:29:15.121-07:00</updated><title type='text'>दीडशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक दिवस</title><content type='html'>दीडशे वर्षांपूर्वी 1 जुलै याच दिवशी लंडनच्या लिनियन सोसायटीमध्ये जमलेल्या मंडळींना आपण क्रांतीकारी क्षणाचे साक्षीदार आहोत याची कल्पना नसेल. विज्ञानाच्या इतिहासात 1 जुलै 1858 या दिवसाचे महत्व वादातीत आहे. पण केवळ विज्ञानच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील विचारांना नवे वळण देणारे निरीक्षण या दिवशी लिनियन सोसायटीत मांडले गेले. "प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्‍शन' शोधून काढल्याची घोषणा त्या दिवशी चार्लस डार्विन यांनी आल्फ्रेड रसेल वालेस यांच्यासमवेत लिनियन सोसायटीत केली. डार्विन यांच्या या निबंध वाचनापासून उत्क्रांतीचे तत्व संशोधकांना ज्ञात झाले. उत्क्रांती तत्वाने केवळ जीवशास्त्राचीच नव्हे तर अनेक विचारधारांची रुपरेषा बदलून टाकली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात लिनियन सोसायटीच्या सदस्यांना या ऐतिहासिक क्षणाची जाणीव नव्हती. किंबहुना या शोधनिबंधाने ते प्रभावितही झाले नव्हते. "यावर्षी लक्षणीय असा कोणताही नवा शोध वा निबंध सादर झालेला नाही', असे सोसायटीच्या 1858च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अर्थात काही जाणकारांचे त्याकडे लक्ष गेले होते. त्यातही डार्विनपेक्षा वालेसच्या युक्तिवादाने त्यावेळचे संशोधक अधिक प्रभावित झाले होते.तथापि, पुढील वर्षी डार्विन यांचा "ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीस' हा ग्रंथ प्रसिद्ध होताच त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले. या ग्रंथाने अभूतपूर्व क्रांती केली. निसर्गाचा अद्‌भूत इतिहास ग्रंथाने जगासमोर ठेवला. यातील तपशील थक्क करणारा होता. जीवशास्त्रीय निरीक्षणे तोपर्यंत बरीच झाली असली तरी त्यामध्ये निश्‍चित सूत्र सांगितले गेले नव्हते. या ग्रंथाने ते सूत्र दाखवून दिले. हे सूत्र नुसते कल्पित नव्हते, तर विविध खंडातून जमा झालेला सज्जड पुरावा या ग्रंथात सादर करण्यात आला होता. संशोधनाची अनेक दालने या ग्रंथाने उघडून दिली. त्याचबरोबर विज्ञानाबाहेरील क्षेत्रातील अनेक विचारधारा उत्क्रांती तत्वाच्या अनुषंगाने आपले संदर्भ तपासून पाहू लागल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या ग्रंथांने जीवशास्त्रासह राजकारण, अर्थकारण, समाजकारण इतकेच नव्हे तर अध्यात्मासारख्या अनेक क्षेत्रांवर प्रभाव टाकला. इतका सर्वदूर प्रभाव टाकणारे दुसरे कोणतेही निरीक्षण मानवी इतिहासात सापडणार नाही.उत्क्रांती तत्व फक्त डार्विन यानाच उमजले होते हे खरे नव्हे. "इकॉनॉमिस्ट'च्या पूर्वीच्या वार्ताहर व सध्या लंडनच्या इंपिरिअल कॉलेजमध्ये रिसर्च फेलो असलेल्या ऑलिव्हिया जुडसन यांनी याबाबत आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेले मार्मिक टीपण वाचण्यासारखे आहे. डार्विनच्या आजोबांनी या तत्वाचा उल्लेख केला होता, तसेच डार्विनपूर्वी 40 वर्षे विल्यम वेल्स यांनी, तर डार्विन जगप्रवासाला निघाला त्याच वर्षी पेट्रीक मॅथ्यू यांनी याचा उच्चार केला होता. तथापि डार्विन पूर्वीच्या संशोधकांना जगासमोर सज्जड पुरावा ठेवता आला नाही. उत्क्रांती तत्वाच्या समर्थनार्थ डार्विन यांनी तपशीलवार पुरावा सादर केला. म्हणून हे तत्व ठसठशीतपणे उभे राहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'एचएमएस बीगल' या बोटीवरून डार्विन यांनी 1831 ते 1836 अशी पाच वर्षे जगप्रवास केला. इंग्लंडहून अटलांटिक पार करून दक्षिण अमेरिकेला वळसा घालून ते न्यूझीलंडला पोहोचले. तेथून ऑस्ट्रेलियामार्गे आफ्रिकेत आले. पुन्हा दक्षिण अमेरिकेला भेट देऊन हे जहाज लंडनला परतले. या सर्व काळात अनेक अडचणी व शारिरीक यातना यांना तोंड देत डार्विन यांनी असंख्य प्राणी व वनस्पतींचे निरीक्षण केले. या निरीक्षणाच्या नोंदी ठेवल्या. अशा नोंदींच्या शंभरएक वह्या उपलब्ध आहेत. या नोंदींवरून निष्कर्ष काढले. ते विविध निबंधांतून उतरवून ठेवले. हे निबंध व त्याला पूरक असे पुरावे डार्विन ठिकठिकाणाहून लंडनला पाठवीत असत. परिणामी पाच वर्षाच्या प्रवासानंतर ते परतले तेव्हा संशोधक म्हणून त्यांनी नाव कमाविले होते. पुढील वीस वर्षे डार्विन यांनी उत्क्रांती तत्वाच्या चिंतनात घालविली. यावेळीही त्यांचे निरीक्षण, परिक्षण, पुरावे गोळा करणे हे चालूच होते. 1844मध्ये यासंदर्भात त्यांनी पहिले टीपण तयार केले. अकाली मृत्यू आल्यास ते प्रसिद्ध करायचे होते. अन्य काही विषयांवर त्यांची पुस्तके प्रसिद्ध होत होती. पण उत्क्रांतीला त्यांनी हात घातला नव्हता. मात्र जून 1858मध्ये वालेस या तरूण संशोधकाने आपले हस्तलिखित डार्विन यांच्याकडे पाठविले. नैसर्गिक निवडीने होणाऱ्या उत्क्रांतीची प्राथमिक रुपरेषा वालेस यांनी मांडली होती. ती पाहताच डार्विन यांनी वालेस यांच्यासह शोधनिबंध सादर केला आणि एका नव्या युगाला सुरुवात झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण खरा प्रभाव पडला तो "ओरिजिन' हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यापासून. ऑलिव्हिया ज्यूडसन म्हणतात त्याप्रमाणे "या ग्रंथांने माणसांची दृष्टीच बदलून टाकली. निसर्गात कार्यरत असणारे एक प्रमुख तत्व पुराव्यानिशी जगासमोर आले. केवळ जगाबद्दलच नव्हे तर माणसाचा स्वतःबद्दलचाही दृष्टीकोन या ग्रंथाने बदलला. निसर्ग नामक अफाट पसरलेल्या वृक्षाचीच मानव ही एक शाखा आहे हे या ग्रंथाने दाखवून दिले. प्राणी, वनस्पती, जीवपेशी या सर्वांचे परस्परांशी असलेले नाते उलगडून दाखविले'.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ओरिजिन' या ग्रंथाचा विशेष त्यामधील पुराव्यामध्ये आहे. डार्विन यांचा दबदबा निर्माण झाला तो पुरावे सादर करण्याच्या व ते मिळविण्यासाठी अफाट मेहनत घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे. विज्ञानाच्या अनेक पाऊलखुणा प्राचीन भारतीय ग्रंथात दिसतात असे नेहमी सांगतात. परंतु, योग व आयुर्वेद वगळता विस्तिर्ण व सज्जड पुराव्यानिशी सादर होणारे दर्शन वा उपपत्ती आपल्या परंपरेत दाखविता येणार नाही. योग व आयुर्वेदातही पुराव्यांची संख्या मर्यादित आहे. विश्‍वाची उत्पत्ती, तसेच मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंध याबाबत हिंदू तत्वज्ञानाने खूप खोलवर विचार आहे यात शंकाच नाही. प्राचीन ऋषींच्या प्रतिभेची झेप पाहून थक्क व्हायला होत असले तरी सज्जड पुराव्याचा आधार नसल्याने ही दर्शने ताकदीची असूनही त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही. निरीक्षणे, आकडेवारी यांचा आधार घेऊन बोलण्याची सवय भारतीयांना नसल्याने अतिरंजीत बोलणाऱ्यांचे सर्वच क्षेत्रात फावलेले आढळते.पुरावे सादर करीत बोलण्याची जी बैठक डार्विन यांनी घालून दिली त्यामध्ये पाश्‍चात्यांच्या वैज्ञानिक ताकदीचे रहस्य आहे. अभ्यासाची ही बैठक आपल्याकडे फक्त "गीतारहस्या'त लोकमान्य टिळकांनी मांडलेली दिसते. डार्विन यांच्या हयातीत ग्रंथांच्या सहा आवृत्त्या निघाल्या. प्रत्येक आवृत्तीत ते अधिकाधिक सुधारणा करीत गेले. "ओरिजिन' ग्रंथाच्या प्रकाशनाला पुढील वर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत असून डार्विन यांच्या जन्मालाही दोनशे वर्षे होत आहेत. यानिमित्ताने जगभर अनेक कार्यक्रम साजरे होणार आहेत. बीगल जहाजाची पुर्नबांधणी होणार आहे. विविध विद्यापीठे तयारीला लागली आहेत. "गार्डियन'सारख्या वृत्तपत्रांनी विशेष वेब पेज तयार केली आहेत. "डार्विन ऑन लाईन' या संकेतस्थळाला आजपर्यंत चार कोटीहून अधिक वाचकांनी भेट दिली असून आता डार्विन यांचा संपूर्ण पत्रव्यवहार तसेच त्यांच्या पत्नीच्या दैनदिनीचे खंड तेथे उपलब्ध होणार आहेत. 1 जुलै 1858 रोजी डार्विन यांनी वाचलेला निबंध या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो मूळ स्वरुपात पाहताना व वाचताना मन थरारून उठते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- पूर्वप्रसिद्धी, सकाळ, 2 जुलै 2008&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3435637611605346433-1008411023670304442?l=dixitprashant.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dixitprashant.blogspot.com/feeds/1008411023670304442/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3435637611605346433&amp;postID=1008411023670304442' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/1008411023670304442'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3435637611605346433/posts/default/1008411023670304442'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dixitprashant.blogspot.com/2008/07/blog-post.html' title='दीडशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक दिवस'/><author><name>प्रशांत दीक्षित</name><uri>http://www.blogger.com/profile/00657154930428085182</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry></feed>
